पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
9 Apr
Follow

हिरव्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर, दूध उत्पादनात तब्बल 30 टक्क्यांनी घट

कोल्हापूर: यंदाचा गळीत हंगाम संपल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच उष्णतेचा पारा 40 अंशांवर गेल्याने दूध उत्पादनात 30 ते 40 टक्क्यांनी घट होत असल्याने शेतकऱ्यांची मोठी कोंडी होताना दिसत आहे. चाऱ्यासाठी दूध उत्पादकांना कसरत करावी लागत आहे. सध्या तरी पशुपालकांना दुभत्या जनावरांसाठी पावसाळा सुरू होईपर्यंत हिरव्या आणि सुक्या चाऱ्याची तजवीज करताना कसरत होत आहे. याचा दुभत्या जनावरांवर परिणाम होऊन दूध उत्पादनात कमालीची घट झाली आहे.


50 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ