पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
22 Nov
Follow

केळीचे दर वाढले, उत्पादनात दोन महिन्याचा खंड पडण्याची ही पहिलीच वेळ

जळगाव जिल्ह्यात ऑक्टोबर ते जानेवारीदरम्यानच्या लागवडीखालील केळीबागा उपलब्ध नसल्याने गत दीड- दोन महिन्यांपासून केळी उत्पादनात खंड पडला आहे. रावेर तालुक्याच्या इतिहासातील हा दुर्मीळ काळ असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे. रावेर व ब-हाणपूर केळी बाजारपेठेत 2 हजार 500 रुपये प्रतिक्विंटल असा तेजीचा भाव असला तरी, केळी उपलब्धत नसल्याने उत्पादक शेतकऱ्यांना हा जणू कोरडाच दिलासा ठरत आहे.


43 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ