पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
21 Apr
Follow

खानदेशात उष्णता वाढली

खानदेशात उष्णता दिवसागणिक वाढत आहे. कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत असून, शेतीकामांवर परिणाम होत आहे. या आठवड्यात कमाल तापमानात सतत वाढ होत आहे. मंगळवारी (ता. १६) व बुधवारी (ता. १७) कमाल तापमान अनुक्रमे ४३ व ४४ अंश सेल्सिअसपर्यंत होते. उष्ण लाटेचा इशारा खानदेशात देण्यात आला होता. यातच ढगाळ वातावरणही आहे. रात्री उकाडा प्रचंड वाढला असून, शेतीकामे सकाळी १० पर्यंत उरकून घेण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत.


28 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ