सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
साठवलेल्या कांद्याचा व्यापाऱ्यांना फायदा

चाकणसह राज्य तसेच देशातील घाऊक बाजारात कांद्याला प्रतिकिलोस किमान ३० ते ६० रुपये बाजारभाव मिळत आहे. किरकोळ बाजारात चांगल्या प्रतीचा कांदा ८० रुपयांपर्यंत येऊन ठेपला आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत वाढलेल्या बाजारभावाचा जास्तीत जास्त फायदा कांद्याची साठवणूक केलेल्या व्यापाऱ्यांनाच होताना दिसत आहे. सध्या देशात दिल्ली व इतर बाजारात जुन्या कांद्याची आवक कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे चांगला दर मिळत आहे. राज्यात नाशिक, चाकण, सोलापूर या बाजारातून कांद्याची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होते. काही महिन्यांपासून बांगलादेशने कांद्यावर आयात शुल्क लावले होते.
28 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
