पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
24 July
Follow

शेतीसाठी शब्दांचा फुलोरा!

ग्रामीण भारतातील असंतोष आणि बेरोजगारीचा उग्र प्रश्न याचा लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यामुळे सावध झालेल्या केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात रोजगारनिर्मिती, ग्रामीण विकास आणि मध्यमवर्ग या तीन घटकांवर भर दिला आहे. शेती क्षेत्राला आपले सर्वोच्च प्राधान्य असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात आवर्जून सांगितले; परंतु शेती संशोधनावर भर आणि भाजीपाला पिकांसाठी क्लस्टर या खेरीज शेती क्षेत्रासाठी एकही नवीन घोषणा करण्यात आलेली नाही. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही शेतीच्या वाट्याला शाब्दिक फुलोऱ्याखेरीज फारसे भरीव काही आलेले नाही.


50 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ