पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
10 June
Follow

तेरा लाख शेतकऱ्यांना धान्य नाही अन पैसेही

शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) परंतु राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समावेश नसलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांसाठी सरकारने शेतकरी धान्य योजना सुरू केली होती. या योजनेत एक जानेवारी २०२३ पासून बदल करत कुटुंबांना धान्याच्या मोबदल्यात प्रत्येक सदस्याला दीडशे रुपये देण्याचा निर्णय घेतला. मात्र, योजनेच्या प्रणालीतील त्रुटींसह शेतकऱ्यांच्या कुटुंबांतील ज्येष्ठ महिलांचे खाते नसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या हातात वर्ष झाले तरी ही रक्कम पडलेली नाही. मराठवाड्यातील २० लाख १८ हजार ८२६ पैकी केवळ सात लाख २६ हजार ९९४ शेतकऱ्यांना धान्याच्या बदल्यात पैसे मिळाले असून तब्बल १३ लाख शेतकऱ्यांना धान्य नाही अन् पैसेही अशी स्थिती आहे.


71 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ