तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

Budget 2024 : अर्थसंकल्पातून शेती क्षेत्राच्या वाट्याला काय आलं ? महत्त्वाचे मुद्दे जाणून घ्या!

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत मंगळवारी (ता. २३) अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये शेतकऱ्यांसाठी घोषणा केल्या आहेत. यामध्ये नऊ क्षेत्रावर विशेष भर देण्यात येणार असल्याचा दावा केंद्रिय अर्थमंत्र्यांनी भाषणात केला. तसेच शेती क्षेत्राला पहिलं प्राधान्य असून कृषी, रोजगार, मनुष्यबळ विकास, सामाजिक न्याय, उत्पादन आणि सेवा क्षेत्र, ऊर्जा क्षेत्र, इनोव्हेशन, संशोधनावर भर देण्यात आल्याचा दावा अर्थमंत्री सितारामन यांनी केला आहे. २०४७ पर्यंत विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पहिलं प्राधान्य शेतीसाठी असणार आहे. त्यामध्ये पुढील मुद्द्यावर लक्ष्य केंद्रित करण्यात येणार आहे.

१) हवामान बदल आणि संशोधन

२) नवीन वाणांची निर्मिती

३) भाजपाला उत्पादन आणि मुल्यसाखळी

४) तेलबिया आत्मनिर्भरता

५) नैसर्गिक शेती

६) कोळंबी उत्पादन आणि निर्यात

७) डिजिटल पब्लिक इन्फ्रा


66 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor