तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
9 Dec
Follow

आंबा-काजू विमा योजेनेकडे १ हजार बागायतदारांची पाठ

पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ३५ हजार ८०१ बागायतदारांनी आंबा व काजू क्षेत्रावरील विमा उतरवला आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा १ हजार बागायतदारांनी विमा योजनेकडे पाठ फिरविली आहे. शासनाने दहा गुंठे क्षेत्र असेल त्यांनाच विमा योजनेत सहभागी करून घेण्याच्या अटीमुळे बागायतदारांच्या संख्येत घट झाली आहे. पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यात अर्थार्जन मिळवून देणाऱ्या आंबा व काजू या पिकांचा फळपीक विमा योजनेत समावेश करण्यात आला आहे.


36 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor