ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
देवळी तालुका होणार फळपिकांचे हब

महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वर्धा जिल्ह्याची देशभरात वेगळी ओळख आहे. ही ओळख कायम ठेवत याच जिल्ह्यातील देवळी तालुका हा आता फळपीक लागवडीच्या माध्यमातून फळपिकांचे हब म्हणून नावारूपास येत आहे. त्या अंतर्गत देवळी तालुक्यातील गौळ या गावात बारा शेतकऱ्यांच्या माध्यमातून १६ एकरावर पेरू लागवड करण्यात आली. महात्मा गांधी, विनोबा भावे यांनी आपल्या आयुष्यातील काही काळ वर्धा जिल्ह्यात घालविला. या दोन्ही महापुरुषांमुळेच जिल्ह्यात ग्रामोद्योगाला चालना मिळाली. पशुपालनाच्या माध्यमातून धवलक्रांतीही अनेक गावांत घडली. आता देवळी तालुका हा फळपिकाच्या माध्यमातून पुढे येत आहे.
48 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
