ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
4 Dec
Follow
दर वाढल्याने पाच क्विंटल लाल कांद्यावर डल्ला

सद्यःस्थितीत कांद्याला दर टिकून आहेत. अशातच येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी येथे चक्क शेतकऱ्यांच्या शेतातूनच पाच क्विंटल कांदा चोरीला गेला आहे. या चोरीमुळे शेतकऱ्याला सुमारे २० ते २५ हजारांचा भुर्दंड बसला आहे. चाळीत साठवलेला उन्हाळ कांदा संपण्याच्या अवस्थेत आहे. सध्या उन्हाळ कांद्याला पाच हजारांच्या आसपास दर मिळत असून, हळूहळू लाल कांदाही आता बाजारात येत आहे. यंदा परतीच्या पावसामुळे लाल कांद्याचे नुकसान झाल्याने उत्पादनात घट झाली आहे.
 
  
 
44 Likes
 Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
