ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
कांदा उत्पादकांच्या कष्टांना केंद्राच्या हस्तक्षेपाचा सुरुंग

लेट खरीप कांद्याची आवक बाजारात सुरू आहे, त्यातच आता रब्बी हंगामातील नवीन उन्हाळ कांद्याची आवक सुरू झाली आहे. तुलनेत आवक वाढण्याची स्थिती आहे. मात्र मागणी कमी झाल्याने त्याचा परिणाम परराज्यांतील बाजारात होणाऱ्या पुरवठ्यावर झाला आहे. त्यातच २० टक्के निर्यात शुल्कामुळे निर्यात रोडावली आहे. परिणामी रब्बी कांदा हंगामाच्या सुरुवातीलाच क्विंटलमागे ९५० रुपयांवर घसरण झाली आहे. केंद्राचा हस्तक्षेप व धोरणे कारणीभूत असून कांदा उत्पादकांच्या कष्टांना एक प्रकारे सुरुंग लावला जात आहे.
56 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
