तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

कांद्याचे भाव सुधारतील का?

आता लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू झाली. निवडणुकीच्या या धुराळ्यात कांदा बाजाराचं भविष्य कसं राहणार याची चर्चा सुरू झाली. कारण कांद्यावर निर्यातबंदी आहे 31 मार्चपर्यंत. सरकारने निर्यातबंदीची मुदत वाढवली नाही. त्यामुळे 31 मार्चनंतर निर्यात खुली होणार, असा त्याचा ढोबळ अर्थ होतो. पण यंदाचं कांदा उत्पादन, मागणी आणि निर्यातीचं समीकरण पाहिलं तर भाव सुधारतील. शेतकरी कांदा निर्यातबंदी कधी उठते आणि भाव सुधारतात याचीच वाट पाहत आहेत. भाव वाढले तरच शेतकऱ्यांचं अर्थकारण रुळावर येईल.


35 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor