ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
कापसाच्या वेचणीसाठी मिळेनात मजूर

लातूर तालुक्यात परतीच्या पावसाने नुकसान झाले. आता सर्व शेतकऱ्यांचा कापूस एकाच वेळी वेचणीला आल्याने मजूर मिळत नाही. अन् शेतात कापूस वेचणीविना उभाच आहे. अनेक शेतकऱ्यांना परिवारासह पांढऱ्या सोन्याची वेचणी करावी लागत आहे. तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड करण्यात आली. शेतकऱ्यांनी खुरपणी, वखरणी, औषधाची फवारणी, खतांचा डोस या पिकांना दिला आहे. त्यामुळे पिके चांगली आली होती. पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे.
48 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
