तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
3 Dec
Follow

खानदेशात पावसाने कापूस, तूर, फळबागांची मोठी हानी

खानदेशात रविवार (ता. 26) व सोमवारी (ता. 27) झालेल्या पावसात तूर, कापूस व फळ बागांची मोठी हानी झाली आहे. अनेक गावांत कापूस पीक आडवे झाले असून, शेतकरी चिंतेत आहेत. पंचनामे सुरूच आहेत. मंगळवारी (ता. 28) खानदेशात अपवाद वगळता पाऊस फारसा नव्हता. काही भागांत मध्यम पाऊस झाला. परंतु रविवार व सोमवारच्या पावसात भडगाव, पाचोरा भागांतील लिंबू, पेरू, चिकूच्या बागांचे नुकसान झाले आहे. याबाबतत पंचनामे अद्याप सुरू झालेले नाहीत, अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.


53 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor