तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
14 May
Follow

खानदेशात वादळी पावसाचा पिकांना फटका सुरूच


खानदेशात वादळी पावसाचा विविध पिकांना पुन्हा एकदा फटका बसला आहे. केळीसह भाजीपाला पिकांची मोठी हानी झाली असून, नुकसान सतत होत असल्याने शेतकरी राजा अडचणीत आला आहे. रविवारी (ता. १२) खानदेशात धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात विविध भागांत वादळी पाऊस झाला. यामुळे केळी, टोमॅटो, कारली, पपई आदी पिकांची हानी झाली. तसेच शेतात उघड्यावर पडलेल्या चाऱ्याची नासाडी झाली आहे. जळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुक्यातील अनेक गावांत पाऊस झाला. त्यात बाळद व परिसरात वादळाने केळीची हानी झाली. सायंकाळी हा पाऊस झाला. मागील तीन ते चार दिवस पावसाचे वातावरण परिसरात आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

46 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor