ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
खबरदारी घ्या! चार महिने बिबट्यांचा प्रजनन काळ; ऊसतोड कामगार, शेतकऱ्यांनी जागरूक राहणे गरजेचे

शिराळा : जंगलामध्ये वन्य प्राण्यांना पुरेसे खाद्य उपलब्ध नाही. त्यातच वनक्षेत्रात मानवी हस्तक्षेपामुळे मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी मानवी वस्तीत शिरकाव करत आहेत. चांदोली परिसरातून बाहेर पडलेल्या बिबट्यांसह अन्य वन्य प्राण्यांचा वावर ऊस क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याचा कृष्णा-वारणाकाठी धोका वाढला आहे. पुढील तीन-चार महिने बिबट्यांचा प्रजनन काळ असल्याने धोका वाढला आहे. त्यामुळे ऊसतोड कामगार, नागरिक, शेतकऱ्यांनी जागरूक राहणे गरजेचे आहे.
53 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
