ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
मे अखेरपर्यंत करावी जनावरांची इअर टॅगिंग

"इअर टॅगिंग असल्याशिवाय एक जून नंतर कोणत्याही जनावरांची राज्यात खरेदी-विक्री करता येणार नसल्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने घेतला आहे. विशेष म्हणजे हे टॅगिंग नसल्यास शासनाच्या पशुवैद्यकीय संस्था, दवाखान्यांमधून पशुवैद्यकीय सेवाही बंद केल्या जातील. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी ३१ मे पर्यंत जनावरांचे टॅगिंग करून घ्यावे. त्यासाठी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करावा," असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे यांनी केले.
46 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
