ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
महापुराचा भाजीपाला मार्केटवर परिणाम, आवक मंदावल्याने बाजारभावात अस्थिरता

कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यासह परजिल्ह्यांतून कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या पालेभाज्यांची आवक निम्म्यावर आली आहे. त्यात टोमॅटो, वांगी, दोडक्याचे दर वीस रुपयांनी खाली आले आहेत. गवार, कांदा, बटाट्याचे दर स्थिर असून, लिंबू दहा रुपयांस सहा नग असा भाव आहे. मिरचीचा दर ४० ते ६० रुपये प्रतिकिलो आहे. मिरज, शिरोळ, आदी भागांतून येणाऱ्या पालेभाज्यांची पुरामुळे वाहतूक बंद झाली आहे. विशेष म्हणजे कडधान्यांवर अधिक भर दिला जात आहे. त्यामुळे तयार मोड आलेल्या मटकी, मसूर, हरभरा, छोले, काळे वाटाणे, आदींना मागणी वाढली आहे.
38 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
