ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
29 Nov
Follow
पाच साखर कारखान्यांकडून खानदेशात गाळपाची तयारी
![](/_next/image?url=https%3A%2F%2Fdehaat-kheti-prod.s3.amazonaws.com%2Fdjango-summernote%2F2024-11-28%2F49dd3ea3-1d8c-4e36-bbf2-040161053945.jpg&w=3840&q=75)
खानदेशात उसाखालील क्षेत्र स्थिर आहे. परंतु यंदा ऊस तोडणी निवडणुकीच्या धामधुमीत लांबली आहे. आता पुढील महिन्यात ऊस तोडणी सुरू होईल, अशी स्थिती असून, तोडणीची तयारी पूर्ण झाल्याचे दिसत आहे. नंदुरबार जिल्ह्यात उसाची १४ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. खानदेशात ऑक्टोबरच्या अखेरीस साखर कारखाने सुरू होतील, असे संकेत होते. परंतु दिवाळी व लागलीच विधानसभा निवडणूक अशी लगबग सुरू झाली. यात गाळप हंगाम लांबला. पण कारखाने डिसेंबरच्या सुरुवातीला सुरू होणार आहेत. यामुळे गाळपासंबंधी कार्यवाही गती घेईल. तसेच गाळप सर्व क्षेत्रांतील उसाचे होईल, असे दिसत आहे. मागील हंगामातही गाळप वेगात झाले होते.
52 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा
![Get free advice from a crop doctor](/_next/image?url=%2F_next%2Fstatic%2Fmedia%2Fget-help.47979653.webp&w=384&q=75)
Get free advice from a crop doctor
![download_app](/_next/image?url=%2F_next%2Fstatic%2Fmedia%2Fdownload-app-bannerv2.c11782c9.webp&w=1920&q=75)