तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांना शंभर टक्के सौरऊर्जा

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांना शंभर टक्के सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा करण्याची योजना महावितरणने तयार केली आहे. यासाठी गावांची निवड केलेली असून निवडलेल्या गावांना येत्या दोन महिन्यांत सौरउर्जेद्वारे शंभर टक्के वीजपुरवठा करण्यात येणार आहे. निवड झालेल्या गावात प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत घरगुती ग्राहकांना ३ किलोवॉटपर्यंत ७८ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येईल. पाणीपुरवठा, दिवाबत्ती योजनांच्या सौर ऊर्जीकरणासाठी शासकीय निधीतून पैसे उपलब्ध केले जातील. या गावातील सर्व वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांना या योजनेत सहभागी होण्यासाठी महावितरण आवाहन करणार आहे.


56 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor