ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
राज्यात दुष्काळाची भीषण स्थिती पीक कर्ज माफी द्या, राजू शेट्टी आक्रमक

राज्यात दुष्काळाची स्थिती भीषण असून सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे केली. पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांची भेट घेऊन दुष्काळाच्या तीव्रतेची परिस्थिती दाहकता समोर मांडून यावर ठोस उपाययोजना करण्याची त्यांनी मागणी केली. तसेच शक्तीपीठ महामार्गावरील जमिनी लुटण्याचे सरकारचे कारस्थान आम्ही हाणून पाडू, हा महामार्ग तातडीने मागे घ्यावा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशाराही शेट्टी यांनी यावेळी दिला.
52 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
