तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

रत्नागिरीत ३६ हजार बागायतदारांना विमा परताव्याची प्रतीक्षा

हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेचा कालावधी संपून दोन महिने लोटले तरीही विमा कंपन्यांनी परतावा जाहीर केलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ३६ हजार ९०९ बागायतदारांना परताव्याची प्रतीक्षा आहे. विमा कालावधी संपल्यानंतर कंपनीकडून ४५ दिवसात बागायतदारांना विमा परतावा रक्कम प्राप्त होणे आवश्यक आहे. मात्र, अद्याप विमा कंपन्यांकडून परतावाच जाहीर केलेला नसल्याची बाब पुढे आली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पीक उत्पादनावर परिणाम होत असल्याने हवामानावर आधारित फळपीक विमा योजना केंद्र शासनाने जाहीर केली आहे.


62 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor