ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
शेतकऱ्यांना 'केवायसी' करूनही अनुदान मिळेना

जिल्हा प्रशासनाच्या आवाहनानुसार 'केवायसी'ची प्रक्रिया पूर्ण करूनही जिल्ह्यातील ३० हजार ४०३ शेतकऱ्यांना अजून ५० कोटी ९१ लाख रुपये दुष्काळी अनुदान मिळालेले नाही. या शेतकऱ्यांच्या बैंक खात्यावर तातडीने अनुदान जमा करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. गेल्या वर्षीच्या खरिपात जिल्ह्यात अपुरा पाऊस झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर सरकारने ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी राज्यातील ४० तालुक्यांमध्ये गंभीर व मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला होता.
55 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
