ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
सुविधांअभावी ऊसतोड कामगारांची गैरसोय

ऑक्टोबरमध्ये सुरू होणारे साखर कारखाने यंदा विधानसभा निवडणुकीमुळे उशिराने सुरू झाले आहेत. निवडणुकीची धामधूम संपताच हे कामगार कारखान्यावर रवाना झाल्याने आता कारखान्यांचा परिसर गजबजला आहे. जागोजागी कारखाना परिसराला गावांचे स्वरूप आले आहे. गोदावरी नदीच्या काठावर ऊस उत्पादन अधिक असल्याने साखर कारखान्याची संख्याही जास्त आहे. मात्र या कामगारांना निवास, त्यांच्या पाल्यांना शाळा व सुरक्षिततेची साधने अशा कुठल्याही सुविधा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे कामगारांचे संघर्षमय जीवन सुरूच आहे.
47 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
