ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
थेट कारखाने बंद ठेवण्याचा साखर उद्योगाचा इशारा

साखर व इथेनॉलचे दर वाढवून देण्यास केंद्र शासन टाळाटाळ करीत असल्याने संतप्त झालेल्या खासगी साखर उद्योगाने थेट कारखाने बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. राज्याचा गाळप हंगाम दोन आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. यंदा १४ लाख हेक्टरवरील ऊस गाळप करीत ११० लाख टन साखर निर्मितीचे आव्हान उभे आहे. परंतु साखरेच्या 'एमएसपी'त आणि इथेनॉलच्या खरेदी दरात वाढ न केल्यामुळे यंदा धुराडी पेटवणेच साखर उद्योगाला अडचणीचे वाटते आहे.
43 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
