ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
वाढत्या तापमानाचा आंबा पिकाला फटका

हवामान बदलाचा फटका कृषी क्षेत्राला बसत असल्याचे बोलले जात होते. मात्र त्याचे दृष्य परिणाम थेट जाणवू लागले आहेत. कोकणातील थंडीचे कमी दिवस, चाळिशी पार गेलेला पारा, याचा फटका हापूस आंबा उत्पादनाला बसला आहे. वाढत्या तापमानामुळे पहिला मोहर जळाला, तर दुसरा मोहर वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना धडपड करावी लागत आहे. हवामानाच्या चढ-उताराचा फटका उत्पादनाला बसला असून, फेब्रुवारी-मार्चमध्ये मिळणारा हंगाम हातातून गेला आहे. परिणामी बाजारात देखील आंब्याची अत्यल्प आवक आहे.
37 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
