ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
वादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अल्प

जळगाव जिल्ह्यात वादळी गत काळात पावसासह गारपिटीत मोठ्या क्षेत्रातील केळी व इतर पिके, बागांची हानी विविध भागांत मागील कालावधीत झाली आहे. परंतु भरपाई देताना विमा कंपनीने केळी विमाधारकांच्या तोंडाला पाने पुसल्याची स्थिती आहे. ही भरपाई किंवा विमा योजनेतील वादळात नुकसानीचे परतावे उशिराने शासनाकडून मिळाले. केळी उत्पादकदेखील वादळात नुकसान भरपाईच्या वितरणाबाबत किंवा कमी नुकसान भरपाई दिल्याबाबत नाराज आहेत. विमा कंपनीच्या आडमुठेपणामुळे अनेक जण नुकसानीपासून वंचितही आहेत. २०२३-२४ मध्ये फळ पीकविमा योजनेत जिल्ह्यातील सुमारे ५२ हजारांवर शेतकरी सहभागी झाले.
24 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
