ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
वेळेत परवाने दिल्याने ३८ कारखान्यांची धुराडी पेटली

राज्यातील साखर कारखान्यांना मुदतीत परवाने देण्यात आल्यामुळे ३८ साखर कारखान्यांची धुराडी पेटली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा जवळपास सात लाख टन ऊस गाळप करण्यात आला आहे. राज्याचा ऊस गाळप हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय साखर उद्योगाच्या सल्ल्याने राज्य शासनाच्या मंत्री समितीने घेतला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या मंत्री समितीचा निर्णय योग्य असतानाही विधानसभा निवडणुकीचे कारण सांगून काही राजकीय नेत्यांनी हंगामाचे वेळापत्रक विस्कळीत केले होते.
67 Likes
Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
