ऐका
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
विहिरीसाठी मिळणार आता ४ लाख रुपयांपर्यंत अनुदान; अर्ज प्रक्रिया सुरू

राज्य सरकारनं बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या आर्थिक निकषांमध्ये सुधारणा केल्या आहेत. तसेच नवीन घटकांचा समावेशही केला आहे. त्याबाबतचा शासन निर्णयही १ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार आता नवीन विहिरीसाठी ४ लाख रुपये अनुदान मिळणार आहे. यापूर्वी २ लाख ५० हजार रुपये अनुदान मिळत होतं. त्यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असं आवाहन राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रसिद्धीपत्रकातून केलं आहे.
 
  
 
66 Likes
 Like
Comment
Share
कृपया सुरू ठेवण्यासाठी लॉगिन करा

Get free advice from a crop doctor
