तपशील
ऐका
शेतीविषयक बातम्या
शेतकरी समाचार
DeHaat Channel
5 Dec
Follow

विमा कंपनींच्या हरकतीमुळे पीकविमा 'अग्रिम'ला अडचण; शेतकरी संभ्रमात

शेती व्यवसाय हा आजही मोठ्या प्रमाणावर लहरी निसर्गावरच अवलंबून आहे. हीच बाब लक्षात घेऊन सरकारने यंदा एक रुपयात पीकविमा योजना राबवली. बऱ्याच प्रमाणात शेतकऱ्यांनी त्यात सहभागही घेतला; पण दुष्काळामुळेखरीप हंगामातील पिके वाया गेली असतानाही विमा कंपन्यांनी घेतलेल्या हरकतींमुळे सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी पीकविमा अग्रीमपासून अजूनही वंचित राहिले आहेत. राज्यातील इतर अनेक जिल्ह्यात मात्र अग्रीम देण्यात आले आहे; पण या तीन जिल्ह्यात यामुळे उतरलेल्या विम्याचा लाभ मिळणार की नाही, याबाबत शेतकऱ्यांच्यात मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.


40 Likes
Like
Comment
Share
Get free advice from a crop doctor

Get free advice from a crop doctor